मुंबईतील दरडप्रवण भागाच्या अनुषंगाने आढावा बैठक आज पार पडली, दरड प्रवण क्षेत्रात संरक्षक भिंत बांधण्याबाबतचे प्रस्ताव तातडीने सादर करावेत- मंत्री अनिल पाटील.
अमळनेर प्रतिनिधी :- बापूराव ठाकरे.
मुंबईतील दरडप्रवण भागाच्या अनुषंगाने आज मुंबई शहर, मुंबई उपनगर व ठाणे जिल्ह्याची आढावा बैठक मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी घेतली. ज्या ठिकाणी दरड प्रवण क्षेत्र आहे अशा ठिकाणी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणामार्फत संरक्षक भिंत बांधण्याबाबतचे परिपूर्ण प्रस्ताव 10 दिवसात सादर करावेत, असे निर्देश मंत्री श्री.पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले, मंत्रालयात मुंबईतील दरडप्रवण भागाच्या अनुषंगाने (आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन) मंत्री मा.अनिल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती.
यावेळी मदत व पुनर्वसन विभागाचे प्रधान सचिव असीमकुमार गुप्ता, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुधाकर शिंदे, मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले, अप्पर जिल्हाधिकारी मनीषा जायभाये, जिल्हा नियोजन अधिकारी मुंबई शहर जी.बी सुपेकर, व.ना औटी, ठाणे महानगरपालिकेचे प्रशांत रोडे,श्री. गोडपुरे, यावेळी उपस्थित होते.
मंत्री श्री पाटील म्हणाले की, दरवर्षी प्रमाणे नालेसफाईच्या कामाप्रमाणेच संरक्षक भिंतीच्या वीप होलची साफसफाई करण्यात यावी, तसेच सर्व ग्रामपंचायती, नगरपालिका, नगरपरिषदा व जिल्हा नियोजन समित्या यांनी आपत्ती व्यवस्थापनासाठी पाच टक्के निधी राखीव ठेवण्यात यावा अशा सूचना ही त्यांनी यावेळी केली.
मुंबई शहर, मुंबई उपनगर व ठाणे क्षेत्रातील दरडप्रवण भागाची माहिती व मान्सून कालावधीतील संभाव्य आपत्ती लक्षात घेवून काय काय उपाययोजना करता येतील याबाबत ची माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिली. याशिवाय संबंधित जिल्ह्याच्या अधिकाऱ्यांनी ज्या ठिकाणी दरड कोसळण्याचा धोका आहे त्या ठिकाणी दरड संरक्षक भिंत बांधणे आवश्यक असल्याचे श्री. पाटील यांनी सांगितले. मुंबई शहर, मुंबई उपनगर व ठाणे जिल्ह्यातील खाजगी जमिनीवर स्लम ॲक्ट खालीली घोषित केलेल्या झोपडपट्ट्या ज्यांना अन्य नागरी सुविधा देण्यात येतात अशा ठिकाणीही दरड प्रतिबंधात्मक उपाय योजना राबविण्यात याव्यात असे निर्देश ही श्री पाटील यांनी दिले.!