अमळनेर येथे प्रांत कार्यालयाच्या गेटवर बसून उर्वेश साळुंखे यांचे लक्षवेधी आंदोलन.

रयतसंदेश न्युज नेटवर्क :-

अमळनेर( प्रतिनिधी)-  येथे आदिवासी कोळी लोकांना टोकरेकोळी (एसटी) चे दाखले मिळावेत यासाठी दि. १५ /७/२०२४ पासुन बेमुदत ठिय्या आंदोलनाला बसले आहेत. परंतु ८ दिवस झाले असुन प्रशासन व शासन लक्ष देत नाही आहे.

या आंदोलनाकडे लक्ष दिले पाहिजे यासाठी बुधगाव ता. चोपडा येथील युवक उर्वेश साळुंखे यांनी अमळनेर येथील प्रांत कार्यालयाचे गेट यावर बसून लक्षवेधी आंदोलन केले.

या प्रसंगी जगन्नाथ बाविस्कर, मधुकर गरु सोनवणे, प्रवर्तनचे मदन शिरसाठे ,हिलाल सैदाणे, रामचंद्र सपकाळे, शांताराम कोळी, रावसाहेब शिरसाठ, भुषण कळी, भिमराव कोळी, उखा कोळी, गजानन कोळी, सागर कोळी, सुनील कोळी, वसंत महाराज, साहेबराव कोळी, सुखदेव सोनवणे, अशोक कोळी , सुभाष रामसिंग,यांच्या सह समाज बांधव उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page